technology लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
technology लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ७ जानेवारी, २०१३

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बुरख्याखालील दिखाऊ सुरक्षा व्यवस्था

एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुण्यांना भेटायला जाण्याचा योग नुकताच आला. हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वाराशी माझी गाडी अडवून तिच्याखाली मागून एका चाकावर लावलेला आरसा दांडयाच्या आधाराने फिरवला गेला, डिकी उघडून पुन्हा लावली गेली आणि पुढे जाण्यासाठी गाडीवर थाप पडली. मी मागे वळून भोळसट भाव चेहर्‍यावर आणून विचारले, "काय पाहिलेस रे?", "साब बॉम्ब फिट किया है क्या देखनेकी आर्डर है". मी पुन्हा प्रश्न विचारला, "बॉम्ब कसा असतो रे"? सुरक्षा कर्मचारी ओशाळं हसला आणि मला पुढे जा म्हणाला तोवर माझ्या मागची वाहनं हॉर्न वाजवायला लागली होती. बॉम्बच लावून मला माझं वाहन आत न्यायचं असेल तर तो मी गाडीच्या मागेच लावला पाहिजे असं काही असतं का? अर्थात तेही मला माहीत नाहीये. कारण मी दहशतवादी नाहीये. पण अशा प्रकारच्या तपासण्या आजकाल जागोजाग केल्या जातात. 'भाबड्या' दशहतवाद्यांना वाटावं की आपला इथे काही पाड लागणार नाही असा हेतू असतो की काय न कळे!

स्थळ विमानतळ. इथे तर अनेक सुरक्षा 'सर्कशीतून' जावे लागते. इतर प्रवासात प्रवाशांची एवढी 'सुरक्षा चंगळ' केली जात नाही. विमान प्रवास करणारे सगळेच व्हीआयपी असतात असे अजूनही यंत्रणांना वाटते की काय न कळे. तरी शशी थरूरनी सांगून झालंय की इथेही 'कॅटल क्लास' असतो ते. असो. पहिला मुजरा घडतो तो वाहनातून विमानतळावर शिरण्याअगोदरच. आडव्या तिडव्या लावलेल्या बॅरिकेड्समधून वाहनाचा वेग कमी करत ते पुढे काढावे

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

अक्षय ऊर्जेद्वारे भारत आपली ऊर्जेची गरज भागवू शकेल का? / Can India harness its energy needs from renewable energy resources

आजमितीस भारत आपली ८०% ऊर्जेची गरज कोळसा आणि नैसर्गिक वायू या स्त्रोतांतून भागवत आहे. ही जीवाष्म इंधनसंपदा संपणारी तर आहेच पण त्याच्या वापराने पृथ्वीस हानीकारक अशा हरितगृह वायूंची निर्मिती होते. अणुऊर्जा निर्माण करून बरीचशी गरज भागवावी असा एक विचारप्रवाह आहे. पण त्याला जपानमध्ये त्सुनामीनंतर आलेल्या संकटामुळे विरोध वाढत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर जर्मनीने २०२० पर्यंत अणुऊर्जेचा वापर कमी करण्यात येईल असे जाहीर केले आहे. त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले अक्षय ऊर्जेचे स्त्रोत तपासायला सुरुवात केली आहे. कदाचित ते त्यांची उद्दिष्टे पुरी करुही शकतील.

आपल्याला या दृष्टीने विचार करायचा असेल तर प्रथम हे पहावे लागेल की आपल्याकडे असलेल्या अक्षय ऊर्जास्त्रोतांतून आपण आपली किती गरज भागवू शकू. मोठ्या प्रमाणात यावर विचारमंथन होत आहे. 'करंट सायन्स' (खंड १०३, अंक १०; पृष्ठ ११५३-११६१) या नियतकालिकात आयआयटी, मुंबईतील मानद प्राध्यापक सुखात्मे यांनी हल्लीच एक छान आढावा घेतला आहे. त्यातील विचार चिंतनीय आहेत. प्रा. सुखात्मे अणुशक्ती नियामक मंडळाचे २००० ते २००५ पर्यंत अध्यक्ष ही होते. भारताच्या लोकसंख्यावाढीस २०७० सालापर्यंत स्थैर्य येईल असा अंदाज आहे त्यावेळच्या गरजा ते आपल्या लेखात मांडतात.