विज्ञान लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विज्ञान लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

सजीवांचा बारकोड / Uses of DNA Barcode

प्राणि-प्लवकाचा बारकोड. आभार: http://www.cmarz.org/barcode.html
सुपरमार्केटमध्ये सामान घेताना पाकिटावरील बारकोड स्कॅन करताना पाहिलंय? ते केल्याबरोबर बिलाच्या यादीत वस्तूचं नांव आणि त्याची किंमत आपोआप टाईप केली जाते. आपल्या डोळ्यांना जरी ती केवळ काळी पट्टेरी चौकट दिसली तरी त्या विशिष्ट वस्तूबाबत त्यात माहिती साठवलेली असते. अशीच बारकोडची चौकट प्रत्येक सजीवासाठी असेल तर किती मजा येईल ना? तशी ती आहेच पण वेगळ्या नैसर्गिक स्वरूपात. प्रत्येक सजीवाच्या डीएनए मध्ये त्याची ओळख करून देणारे विशिष्ट गुण असतात हे २००३ साली कॅनडाच्या पॉल हेबर्टनं दाखवून दिलं. त्या जीवाला विशिष्ट ओळख देणाऱ्या गुणांच्या या वर्णनाचं त्यानं 'डीएनए बारकोड' असं नामकरण केलं. म्हणजे असं की या डीएनएची रचना सगळ्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी वेगवेगळी असते आणि त्यावरून त्यांना ओळखता येतं. मायटोकॉन्ड्रीयातील जनुकाचा एक विशिष्ट भाग सर्वसाधारणपणे यासाठी वापरला जातो, अपवाद काही वनस्पतींचा. त्यांच्यासाठी वेगळ्या जनुकाचा बारकोड मान्यता पावला आहे. वनस्पती आणि प्राणी जिवंत अथवा मृत स्थितीत असो किंवा त्यांचं विघटन झालेलं असो त्यांचा डीएनए बारकोड वापरून तो ओळखणं आता सहज शक्य आहे.

शुक्रवार, ६ मार्च, २०१५

वाघांची शिरगणती / Counting tiger population

बंगाली वाघ.  आभार: विकिपिडिया
'बंगाली वाऽऽघ.., दख्खनचा नाऽऽग.. ढुम-ढुम ढुमाक... ढुम-ढुम ढुमाक' अशा गाण्याच्या ओळी लहानपणी म्हटल्याच्या आठवतात. २०व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात वाघांची संख्या सुमारे २० ते ३० हजाराच्या घरात होती असं म्हणतात. एकूणच निसर्गसंपन्न देश होता. गेल्या काही वर्षांपर्यंत भारताची ओळख बऱ्याच जणांना एक जंगलांचा, हत्तींचा प्रदेश म्हणून होती त्या वेळी हे गाणं बालक मंदिरात जाणाऱ्या मुलांना शिकवलं जाणं संयुक्तिकच म्हणावं लागेल. पण गेल्या शतकभरात ही संख्या झपाट्यानं खाली आली. १९७२ सालीं प्रथम वाघांची गणती करायचा प्रयत्न झाला. त्यांच्या पंजांचे ठसे घेऊन ही केली गेली. त्यात काही त्रुटी असतीलही. पण त्यातून सुमारे १८०० वाघच उरलेत असा अंदाज काढला गेला. या खंडात, विशेषतः भारतात आढळणाऱ्या या प्राण्याचं अस्तित्व नष्ट होण्यापासून बचाव आणि संवर्धन करण्यासाठी म्हणून भारत सरकारनं 'प्रॉजेक्ट टायगर' नांवानं एक मोहीम आखली. संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, वाघांची गणना कशी करायची असेही प्रश्न सुरुवातीला होतेच. जनगणना करायला शिक्षकांना आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावण्याइतकं सोपं काम नव्हतं ते! काहीही असो, तेव्हापासून वाघांच्या संवर्धनासाठी अथक प्रयत्न केले गेले. प्राणीमित्र संघटना, इतर जागरुक व्यक्ती यांनी वेळोवेळी सरकारवर दबाब आणून अनेक कायदे केले आणि सावकाश का होईना पण त्या प्रयत्नांना यश येतंय असंच म्हणावं लागेल.

जानेवारी २०१५ च्या वर्तमानपत्रात भारतातील वाघांची संख्या वाढल्याचे मथळे वाचायला मिळाले. सगळ्यांनीच याचं स्वागत केलं. वर्षाच्या सुरुवातीला ही चांगली बातमी आल्यानं अर्थातच सगळेच सुखावले. वाघांच्या २०१४ साली झालेल्या गणनेतून हा निष्कर्ष काढला गेला. सुमारे २००६ साली झालेल्या गणनेपासून वाघांची गणना करण्याच्या पध्दतीत आमूलाग्र बदल केला गेलाय. दर चार वर्षांनी ही गणना केली जात आहे. म्हणजेच २००६ नंतर २०१० आणि आता २०१४ ची ही गणना. या गणना करताना क्लिष्ट पण आवश्यक अशा सांख्यिकी पध्दती, प्रारुपं आणि प्रणालींचा काटेकोरपणे वापर केला गेला आहे आणि म्हणून त्याच्या निष्कर्षात तथ्य असावं असं म्हणायला आधार आहे. कशी करतात ही गणना? भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं २०१४ सालच्या गणनेनंतर एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात याबद्दल दिलेली माहिती छानच आहे.

देशभरात किती वाघ आहेत याचा आढावा दोन टप्प्यात माहितीचा संयुक्त वापर करुन घेतला गेला. यातून किती वाघ आहेत हेच फक्त कळलं नाही तर ते कसे, कुठे विखुरले आहेत हेही लक्षात आलं. भारतात एकूण १८ राज्यांत वाघांचा वावर आहे. या राज्यांच्या वनखात्यांतर्फे प्राथमिक माहिती गोळा केली गेली. नंतर राज्याचे वनखात्यातील प्रशिक्षित कर्मचारी, प्राणीमित्र संघटना आणि भारतीय वन्यजीव संस्थेतील तज्ज्ञांनी एकत्रित येऊन कामं केली. पहिल्या टप्प्यात जिथं वाघ आढळण्याची शक्यता आहे अशा प्रत्येक भूभागाची (beat) बारकाईनं पाहाणी केली. भारतभर असे सुमारे तीस हजार भूभाग पिंजून काढले. त्यातून सुमारे सव्वातीन हजार भूभागात त्यांचा वावर असल्याचं लक्षात आलं. याकरता लाईन-इंटरसेप्ट पध्दत वापरली गेली. या पध्दतीत ज्याची (उदा. वाघांची, विशिष्ट झाडांची, त्याच्याशी पूरक अशा इतर बाबी, वगैरे) गणना करायची असे भूभाग जिथं आहेत अशा परिसरातून जाईल अशी एक रेषा (transect) आखली जाते. या रेषेवरुन मग चालत जाऊन हव्या असलेल्या घटकांचा शोध घेतला जातो. ही पध्दत अतिशय भरवशाची समजली जाते. अशा सुमारे ९० हजार रेषांवरुन दोन लाख तेरा हजार कि.मी. इतकं अंतर हा आढावा घेताना चाललं गेलं. केवळ महाराष्ट्रातच १८ हजारावर रेषा आखल्या गेल्या आणि सुमारे ४७ हजार कि.मी. अंतर चाललं गेलं. यातून तेथील परिसरात वाघांचं भक्ष्य किती प्रमाणात आहे (भक्ष्याच्या विष्ठेच्या प्रमाणावरुन), कशा प्रकारचं जंगल आहे, मानवाचा हस्तक्षेप किती प्रमाणात त्या भागात होतोय, याची माहिती गोळा केली. याला पूरक म्हणून त्या भूभागाचे उपग्रहाद्बारे भूमिस्वरुप (landscape) स्पष्ट करणारे, मानवाच्या अस्तित्वाची आणि एकूणच परिसराच्या इतर गुणवैशिष्ट्यांची माहिती देणारे नकाशे मिळवून अभ्यासले गेले, त्यांचा भूभागावरुन फिरुन गोळा केलेल्या माहितीशी मेळ साधला आणि वाघाच्या अधिवासाची ठिकाणं निश्चित केली गेली.


स्वयंचलित कॅमेरा.  आभार: विकिपिडिया
गणनेच्या दुसऱ्या टप्प्यावर जिथं वाघांचा अधिवास असण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी विशिष्ट कॅमेरे बसवले गेले आणि छायाचित्रं मिळवली गेली. गणनेसाठी कॅमेऱ्यांचा वापर प्राण्यांची किमान संख्या तरी अचूक दर्शवितो. या विशिष्ट प्रकारच्या कॅमेऱ्यांवर संवेदक (sensor) बसवलेले असतात. त्यामुळे कॅमेऱ्याच्या ग्रहणमर्यादेत काहीही हालचाल झाली की त्याच्याद्वारे लगेच ती छायाचित्रबध्द केली जाते. या प्रकाराला 'camera trapping' असं म्हणतात. पूर्वी प्राणी पकडण्यासाठी सापळे/ जाळी लावली जायची आणि त्यांना 'traps' असं म्हणलं जायचं. कदाचित या संकल्पनेवरुन त्या प्राण्यांना कॅमेऱ्यात 'बध्द' (trap) केलं असं म्हणण्याची प्रथा पडली असावी. आता तर अंधारातही हे कॅमेरे छायाचित्र काढू शकतात. तसंच छायाचित्र काढताना त्यांचा आवाजही अत्यंत सूक्ष्म होतो त्यामुळं प्राणी सजग होत नाही आणि तो त्याच्या सहज-सुलभ, निर्भय अवस्थेत टिपता येतो. अशा तंत्रज्ञानामुळे आता वन्य प्राण्यांचं सर्वेक्षण करणं, विशिष्ट वेळेत त्यांचा वावर कुठे असतो, वगैरेचा अभ्यास करणं खूपच सुलभ झालं आहे. काही कॅमेऱ्यावर तर ध्वनिमुद्रणाची आणि चलतचित्रणाची सोयही असते. त्यामुळे वेगवेगळ्या स्थितीतील पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज आणि त्यांच्या हालचाली टिपणंही आता शक्य झालं आहे.

या टप्प्यावर गोळा केलेल्या माहितीचंही पृथःकरण केलं गेलं. एखाद्या ठिकाणच्या वाघाची अधिसत्ता किती अंतरापर्यंत चालते, त्याला पुरेसं भक्ष्य उपलब्ध आहे की नाही, त्या भागात माणसाचा वावर किती प्रमाणात आहे, तेथील परिसर अभ्यास याचा एकत्रित विचार करण्यासाठी भौगोलिक माहिती तंत्राचा (geographic information system)  वापर केला गेला. या अभ्यासातून वाघांच्या अधिवासासाठी आवश्यक अशा गरजांची तसंच त्यांच्या वसाहतींची आणि त्यात कशा प्रकारचं संधान साधलं जातं याची माहिती मिळू शकली.

यानंतर कॅमेऱ्यातून टिपलेल्या छायाचित्रांचं पृथ:करण एका प्रणालीच्या सहाय्याने केलं गेलं. वाघाच्या शरीरावरच्या पट्ट्यांवरुन एकाच वाघाची अनेक छायाचित्रं या प्रणालीद्वारे ओळखता येतात. यातून नेमके किती वाघ टिपले गेले हे कळतं. तक्ता क्र. १ मध्ये शेवटच्या रकान्यात २०१४च्या सर्वेक्षणात विभागवार टिपलेल्या एकूण १५४० वाघांची माहिती दिली आहे. भूभागाच्या सर्वेक्षणात नोंदलेली परिसराची वैशिष्ट्ये, भक्ष्याच्या उपलब्धतेचं प्रमाण, मानवाचा त्या भागातला वावर, तसंच उपग्रहाकडून मिळवलेल्या माहितीचा आणि कॅमेऱ्यातून टिपलेल्या वाघांचा एकत्रित अभ्यास करुन विशिष्ट परिसरातील वाघांच्या अस्तित्वाची माहिती प्रारुपात पडताळली गेली. या प्रारुपातून विशिष्ट भूभागात किती वाघ असण्याची शक्यता आहे याचा अचूक अंदाज बांधता येतो म्हणून त्याचा वापर केला गेला.

अरुणाचल प्रदेश, मिझोराम सारख्या राज्यांच्या काही भागात, जिथं दाट जंगलं आहेत तिथं मोठ्या प्रमाणात भूभाग पिंजून काढणं आणि कॅमेऱ्यांचा वापर करणं अशक्य आहे तिथं वेगळीच पध्दत अवलंबिली. शक्य त्या ठिकाणाहून वाघाच्या विष्ठा गोळा केल्या, त्यातून डीएनए वेगळे केले आणि प्रत्येक वाघाच्या डीएनए ची रचना वेगवेगळी असल्यानं तिथं किती वाघांचं अस्तित्व आहे याचा अंदाज या जनुकीय अभ्यासातून बांधला. ही आणि जिथं कॅमेरे ठेवता आले अशा भागात किती वाघ आहेत या माहितीचं एकत्रीकरण करुन तेथील वाघांच्या संख्येचा अदमास बांधण्यात आला.

तक्ता १: तीन सर्वेक्षणात वाघांच्या गणनेचे केलेले अंदाज

भारताचे प्राकृतिक प्रदेश वर्ष २००६ वर्ष २०१० वर्ष २०१४ २०१४ च्या सर्वेक्षणात कॅमेर्‍यात टिपलेले वाघ
शिवालिक पर्वताच्या रांगा आणि गंगेचा सखल प्रदेश २९७ (२५९-३३५) ३५३ (३२०-३८८) ४८५ (४२७-५४३) ३८७
मध्य भारत ६०१ (४८६-७१८) ६०१ (५१८-६८५) ६८८ (५९६-७८०) ४९१
पश्चिम घाट आणि दक्षिणेकडील राज्ये ४०२ (३३६-४८७) ५३४ (५००-५६८) ७७६ (६८५-८६१) ४६४
पूर्वेकडील राज्ये आणि ब्रह्मपुत्रेचा सखल प्रदेश १११ (०८४-११८) १४८ (११८-१७८) २०१ (१७४-२१२) १३६
सुंदरबन - ७० (०६४-०९०) ७६ (०६२-०९६) ६२
एकूण १४११ (११६५-१६५७) १७०६ (१५२०-१९०९) २२२६ (१९४५-२४९१) १५४०

वाघांच्या गणनेची ही अभिनव पध्दत त्यांच्या संख्येचा अचूक अंदाज बांधण्यासाठी खूपच उपयोगी असल्याचं लक्षात आलं आहे. हीच पध्दत वापरुन तीन वेळा केलेल्या सर्वेक्षणातून भारतात वेगवेगळ्या भूभागात (तक्ता क्र. १) वाघांची उत्तरोत्तर वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात वाघांचं अस्तित्व मुख्यत्वेकरुन विदर्भात (मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगांव-नागझिरा आणि बोर) आणि तुरळक ठिकाणी सह्याद्रिच्या कुशीत दिसून आलं आहे. गोव्याच्या जंगलातही ३-५ वाघ असल्याची नोंद प्रथमच झाली आहे. दक्षिणेच्या राज्यांत, पश्चिम घाट प्रदेशात वाघांची मोठ्या प्रमाणात झालेली वाढ या सर्वेक्षणातून दिसून येते. निसर्गात अन्नसाखळीच्या सर्वात वरच्या टोकाला वाघ हा प्राणी येतो. यांची वाढ म्हणजे निसर्ग सुदृढ असल्याचं लक्षण. सरकारी संस्था, प्राणीमित्र वाढ , वगैरेंच्या एकत्रित प्रयत्नातून हे सावकाश का होईना साधता येत आहे हे लक्षात आल्यावर मनाला उभारी येते.
-----------------------------------------------------------
हा लेख "शैक्षणिक संदर्भ" - अंक ९२; फेब्रु-मार्च २०१५ च्या अंकात पृष्ठ १५-२० वर प्रसिद्ध झाला आहे.

गुरुवार, ८ मे, २०१४

गोव्याच्या मठातला अवशेष जॉर्जियाची राणी केटेवानचाचः डीएनए वापरुन केली चाचणी/ DNA test confirms the relic of Georgian Queen

संत अगुस्तिनचा शिल्लक भाग
दगडी पेटीच्या झाकणाचा नमुना - अशा
पेटीत केटेवान राणीच्या हात जपला होता
राणीच्या हाताचं हाड
इ.स. १६१३ मध्ये इराणचा बादशहा शाह अब्बासनं जॉर्जियावर आक्रमण केलं आणि केटेवान राणीला बंदी बनवून आणलं. त्यानंतर सुमारे दहा वर्षांच्या बंदीकाळात तिला इस्लामची दिक्षा देऊन आपल्या जनानखान्यात सामावून घेण्याचे त्याने अथक प्रयत्न केले पण तिचा छळ करूनही राणी बधली नाही आणि अखेरीस १६२४ साली मृत्यू पावली. यादरम्यान दोन अगुस्तिनीयन साधू तिच्या सोबत राहात होते. तिच्या मृत्युनंतरही १६२४ ते १६२७ च्या दरम्यान तिथंच राहून त्यांनी राणीच्या देहाचे अवशेष तिच्या थडग्यातून मिळवले आणि त्यातील उजवा हात एका दगडी शवपेटीकेतून लपत छपत १६२७ साली गोव्यात आणून संत अगुस्तिनच्या मठातल्या चॅपेलच्या वेदीच्या उजव्या बाजूला दुसर्‍या खिडकीत ठेवला असं इतिहास सांगतो. जॉर्जियातील जनतेच्या मनातील केटेवान राणीच्या बाबतीत असलेली आदरभावना लक्षात घेऊन त्या देशाने भारत सरकारला हे अवशेष शोधण्याची १९८०च्या दशकात विनंती केली आणि तेव्हापासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने अनेक प्रयत्न केले. जुने गोवे येथील हा मठ १५७२ साली अगुस्तिनीयन साधूंनी बांधला होता. १८३५ मध्ये यातील चर्चची पडझड झाली तर १८४२ मध्ये त्याची कमान पडली आणि ही इमारत नंतर तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे उदध्वस्तच झाली होती. त्यातील महत्वाच्या चीजवस्तू गहाळ झाल्या होत्या. इतिहासातील पानात राणीच्या अवशेषांची नेमकी जागा नमूद केलेली असली तरी त्या इमारतीच्या स्थितीमुळे ते अवशेष शोधायला अथक प्रयत्न करावे लागले. अखेरीस २००४ साली पुरातत्ववेत्त्यांना हाताचं एक लांब हाड सापडलं. त्याच्या जवळच दगडी पेटीचं झाकणही सापडल्यामुळे ते राणीचंच असावं असं अनुमान करता येत होतं. या हाडाबरोबरच, आणखीही दोन दग़डी पेट्यात ठेवलेले हाडांचे अवशेष सापडले. लांब हाताचं हाड केटेवान राणीचेच अवशेष आहेत याबाबत पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत नव्हतं पण याची खात्री कशी करणार?

शनिवार, ५ एप्रिल, २०१४

पोलिओ निर्मूलनाच्या आक्षेपांचे खंडन / Polio eradication: Discussion

भारताच्या पोलिओमुक्तीचा सोहळा. आभारः द गार्डियन, छायाचित्रः सौरभ दास
भारतातून पोलिओचं निर्मूलन झालं, तो पोलिओमुक्त देश झाला असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जानेवारी २०१४ मधे जाहीर केलं. इतिहासाची पानं चाळली तर भारतात हा प्रयत्न १९७८ पासून होतोय असं दिसतं. त्या वेळी केलेले प्रयत्न वाया गेले. त्यानंतर १९८८ च्या दरम्यान पुन्हा एक मोहीम राबवली गेली आणि त्या वेळी २००० सालापर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचं ठरवलं गेलं. हा मुहूर्तही चुकला. यानंतर मात्र भारतीय संशोधकांनी जमा केलेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिओच्या निर्मूलनासाठी देण्यात येणार्‍या लसीत आणि कार्यपध्दतीत बदल केला गेला आणि अखेरीस २०१४ मध्ये हे उद्दिष्ट साध्य झाल्याचं दृष्टिपथात येतंय. अर्थात अद्यापही पोलिओचे रुग्ण सापडताहेत आणि सापडतील पण त्यांना कशा प्रकारे यातून मुक्त करावं याची दिशा ठरलेली आहे. पोलिओ हा बेफामपणे पसरणार्‍या पोलिओ विषाणूंमुळे (wild poliovirus - WPV) होतो. या विषाणुंचे तीन प्रकार आहेतः WPV-१, WPV-२ आणि WPV-३. भारतातील पोलिओच्या निर्मूलनाच्या प्रयत्नांची कथा वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडीकल कॉलेजचे डॉ. जेकब जॉन यांनी विस्तृतपणे मांडली आहे (करंट सायन्स, खंड १०५, अंक ९, पृष्ठ ११९९) आणि त्याचा आढावा मी माझ्या ब्लॉगवर  पूर्वीच घेतला आहे.

रविवार, २३ मार्च, २०१४

अनिष्ट परिणामांशिवाय रक्ताची गुठळी फोडणारं अनोखं औषध / A novel clot-buster without side-effects

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने (हृदयस्नायूंना रक्तपुरवठा करण्यात अडथळा आल्याने) भारतात दरवर्षी सुमारे २५ लाख मृत्यू होतात. हा दर सतत वाढता असल्याचंही आढळून आलं आहे. बदलतं राहणीमान, बैठी कार्यपध्दती, आहारातले बदल यामुळे हे असं होत आहे. हृदयविकार म्हणजे नेमकं काय? हृदयावर उठून दिसणार्‍या हृद् रोहिण्या हृदयस्नायूंना प्राणवायू आणि अन्नद्रव्याचा पुरवठा करतात. या रोहिण्यांच्या आतल्या पृष्ठभागावर चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ यांचं एक जाड किटण जमा होतं. हे किटण मग रक्तातल्या इतर घटकांना आणि कोशिकांनाही आकृष्ट करुन घेतं आणि गुठळ्या निर्माण होतात. मग या रोहिण्यांतून हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. याला मग हृदयविकाराचा झटका येणं आणि याच कारणामुळे जेव्हा मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होतो तेव्हा त्याला आघात (स्ट्रोक येणं) असं म्हटलं जातं. ही किटण जमण्याची प्रक्रिया खरं म्हणजे प्रत्येकाच्या बालपणापासूनच होत असते.

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

पोलिओचे उच्चाटन: भारताचे योगदान / India's contribution to polio elimination

भारतात शेवटच्या पोलिओच्या रुग्णाची नोंद १३ जानेवारी २०११ रोजी झाली. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ होणार्‍या देशांच्या यादीतून नंतर आणखी रुग्णांची नोंद होतेय का याची वर्षभर वाट पाहून २०१२ साली वगळले. आता तीन वर्षांअखेर (१३ जानेवारीला २०१४) आणखी रुग्णांची नोंद न झाल्यामुळे यासंबंधी अधिकृत प्रमाणपत्र मिळण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संसर्गजन्य रोगांवर मात ही मानवाच्या नैपुण्याची साक्षच. काही वर्षांपूर्वी देवीच्या रोगावर अशीच मात करण्यात भारत यशस्वी झाला होता. बुळकांड्या/ढेंडाळ्या (rinderpest) या गुरांमध्ये होणार्‍या संसर्गजन्य रोगापासूनही आपण मुक्त झालो याची फारशी माहिती सामान्य वाचकांना नसण्याची शक्यता आहे. पोलिओ हा बेफामपणे पसरणार्‍या पोलिओ विषाणूंमुळे (wild poliovirus - WPV) होतो. या विषाणुंचे तीन प्रकार आहेतः WPV-१, WPV-२ आणि WPV-३.

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

राजकन्येने भूप्रदेश गिळला तेव्हा... / Erosion due to River Princess shipwreck

निसर्गाचं आकर्षण कोणाला नसतं? उंच पर्वतराजी असोत की गर्द हिरवी जंगलं किंवा समुद्रकिनारे. तासनतास इथं शांतपणे बसा. आजिबात कंटाळा येत नाही. निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देत असतो. मग त्याच्या सान्निध्यात कंटाळ्याचा प्रश्नच येतो कुठे? पण बर्‍याच जणांना निसर्गाचं सौंदर्य कसं आस्वादायचं हेच कळत नाही आणि त्याची परिणती ते ओरबाडण्यात होते आणि ते विद्रूप व्हायला सुरुवात होते. गोव्याचे अथांग, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे असेच सगळ्यांना भुरळ घालतात. विदेशी नागरिक तर महिनोनमहिने येथे मुक्काम ठोकून असतात. भारतातल्या इतर भागातले नागरिकही संधी मिळताच गोव्यात पुनःपुन्हा यायला एका पायावर तयार असतात. त्यांच्या स्वछंद आणि 'स्वतंत्र' वागण्याचे विपरीत परिणाम निसर्गावर होत असतातच. पर्यटनाव्यतिरिक्त इतर उद्योगही निसर्गावर मोठे परिणाम घडवत असतातच. ६ जून २००० या दिवशी असाच एक घाला गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर पडला. 'एमव्ही रिव्हर प्रिंसेस' नावाचं प्रचंड मोठं, २५८ मीटर लांब आणि ३५ मीटर रुंदीचं, एक तेलवाहू जहाज वादळामुळे भरकटलं आणि कांदोळीच्या किनार्‍याजवळ ५ मीटर खोल पाण्यात येऊन रुतलं. जहाजाचा पुढचा भाग नैऋत्येला (दप) तोंड करून पुळणीपासून जवळच म्हणजे ३९० मीटर तर मागचा भाग १८७ मीटर अंतरावर होता. तेथून ते हलवण्यात अनेक मानवनिर्मित अडचणी येत गेल्या आणि एप्रिल २०१२ च्या अखेरीपर्यंत हे जहाज तेथेच मुक्काम ठोकून निसर्ग विद्रूप करण्यात आपला हातभार लावत उभं होतं. या दरम्यान तिथं घडलेल्या प्राकृतिक बदलांचा अभ्यास राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी करून नुकताच प्रसिध्द केला आहे (करंट सायन्स खंड १०५, वर्ष २०१३, पृष्ठ ९९०). अशी संकटं निसर्गावर कसा घाला घालतात याची माहिती वाचकांना आणि धोरणकर्त्यांना उद्बोधक ठरावी.

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

कल्पवृक्षाच्या छायेत / Impact of climate change on coconut production

वाढत्या कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये सरासरी तपमानात वाढ, पावसाच्या नित्यतेवर त्याचे होणारे परिणाम, अति उष्ण आणि अति शीत लाटा, दुष्काळ, पूर असा हवामानाचा अतिरेकी लहरीपणा दिसून येणार आहे. अशा घडामोडी फक्त भविष्यातच वाढून ठेवल्या नाहीत तर आताच याची झलक आपण बर्‍याच वेळेला अनुभवत आहोतच. या सगळ्याचा परिणाम साहजिकच शेतीवर, शेती उत्पादनांवर होणार आहे. याला तोंड द्यायला नव्या धान्यांची वाणं, बदललेल्या व्यवस्थापन पद्धती, यावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. धान्यांच्या शेतीला महत्व असतेच पण बागायती उत्पादनंही तितकीच महत्वाची असतात. कारण एकदा का त्याची लागवड केली की वर्षानुवर्ष, बारमाही उत्पादन त्यातून घेता येऊ शकतं. नारळाच्या झाडाचं उदाहरण घ्या ना! एकदा का ते झाड लावलं की सुमारे ५० वर्ष ते फळ देत रहातं.

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

नळी फुंकली सोनारे.... / Would not make any difference...

छायाचित्र आभार: http://www.indiatvnews.com/
डॉ. सी.एन्.आर. रावांना भारत सरकारने 'भारतरत्न' सारखा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. एक उत्तम शिक्षक, वैज्ञानिक, प्रशासक म्हणून त्यांना देशोदेशीच्या विज्ञान अकादम्यांनी अनेक पुरस्कार देऊन यापूर्वीच सन्मानित केले आहे. ६० वर्षांपूर्वी पहिला शोध निबंध लिहिणारे डॉ. राव आज वयाने ८०च्या घरात पोहोचले आहेत आणि अद्यापही कार्यरत आहेत. सुमारे ५० पुस्तके, १६०० शोध निबंध इतके भरगच्च काम त्यांच्या खात्यावर आहे. बंगळूर येथील प्रख्यात भारतीय विज्ञान संस्थेचे

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

भारताच्या जैविक इंधन कार्यक्रमाचा आढावा/ Indian biodiesel programme: A review

जट्रोफाची लागवड (आभार: http://www.jatrophaworld.org/)
भारताचं पेट्रोलजन्य पदार्थांसाठी परदेशांवरील अवलंबित्व आणि त्यांची वाढती गरज हा एक चिंता करण्यासारखाच विषय आहे. आपली परकीय चलनाची गंगाजळी मोठ्या प्रमाणात याच्या आयातीवर खर्च होते. गेल्या काही वर्षात अरब देशांमधील तणावाची परिस्थिती या पदार्थांच्या वाढत्या किंमतीला कारणीभूत आहे पण एकूणच या ना त्या कारणाने याचे भाव सतत वाढते आहेत आणि याची झळ सामान्य माणसाला कशी बसतेय हे आपण गेल्या काही महिन्यात अनुभवतो आहोतच.

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

सारे भारतीय माझे बांधव आहेत.... / Genetic evidence for recent population mixture in India

डीएनए किंवा डीऑक्सिरायबोन्युक्लिक अ‍ॅसिड हा अनुवंशिकता सांगणारा मानवाच्या किंवा प्रत्येक जीवाच्या पेशींमधील एक अविभाज्य घटक आहे. १९८०च्या दशकात डीएनए चा उपयोग गुन्हेगार ओळखणं, वंश संबंध सांगणं, वगैरे कामांसाठी व्हायला लागला आणि ही पध्दत आपल्या सगळ्यांनाच वर्तमानपत्रात 'असल्या' बातम्या वाचून ओळखीची झाली. आनुवंशिकता विज्ञानाची (जेनेटिक्स) समाजाला याद्वारे मोठीच देणगी मिळाली. आपल्याला आपले पूर्वज कोण याचं मोठंच कुतूहल असतं. धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी तेथील पुरोहित त्यांच्याकडील नोंदी पाहून आपल्या वंशावळीची माहिती पूर्वी देत असत. आता ती पध्दत आहे की नाही हे माहीत नाही. ख्रिस्ती समाजात त्यांच्या चर्चमध्ये अशा नोंदी ठेवलेल्या असतात त्यावरून माझ्या एका मित्राने त्यांच्या कुटूंबाचा कुलवृक्ष तयार केला होता. पण ही साधनं आपल्याला काही पिढ्यांपर्यंतच मागे घेऊन जाऊ शकतात. म्हणून डीएनए सारखी साधनं वापरून शास्त्रज्ञ एखाद्या देशाचे पूर्वज कोण, त्यांची संस्कृती कशी होती, पूर्वी स्थलांतरं कशी झाली, वगैरे समजावून घेण्यासाठी उपयोग न करतील तर नवलच. गेल्या दोन दशकात याचा वापर करून अनेक बाबींचा उलगडा त्यांनी केला आहे.

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

सुई शिवाय इंजेक्शन / Needleless drug delivery

स्थळ सरकारी रुग्णालय. वेळ सकाळची. ठराविक वेळेत इथे बालकांना लस दिली जाते. त्यामुळे गर्दी. सगळ्या माता आपआपल्या बाळांना घेऊन आपला नंबर कधी लागतोय याची वाट पहात बसलेल्या आहेत. तसं एकाच वेळेस अनेक बालकांना लस दिली जातेय पण गर्दीच इतकी आहे की थोडा कोलाहल माजलाच आहे. सगळीच बालकं त्यांना सुई टोचल्यावर कळवळून रडताहेत. तर त्यांचा आवाज ऐकून रांगेतल्या इतर बाळांच्या हळुवार मनालाही कसली तरी अनामिक भीती वाटतेय आणि तेही आपला आवाज त्यांच्या आवाजात मिसळताहेत. त्यांना या संवेदनाशून्य जगाचा अद्याप परिचय व्हायचा आहे ना! परिचारिका मात्र निर्विकारपणे एका पाठोपाठ एक बाळांना इंजेक्शनद्वारे नाहीतर तोंडावाटे लस देण्यात गर्क आहेत. बाळांचं रडणं त्यांना सवयीचंच झालं आहे. बाळांच्या आयांनाही बाळाला टोचल्यावर त्यांना दुखलं म्हणून वाईट वाटतंय पण हे होणारंच हे सगळ्यांनीच अध्याहृत धरलंय. पिढ्यानपिढ्या हेच चाललंय. त्यात विशेष ते काय? परिचारिकांना आणि आयांना त्यात विशेष असं वाटत नसलं तरी वैज्ञानिकांना मात्र तसं वाटत नाही. सुई शिवाय इंजेक्शन देता आलं तर किती मजा येईल नां? त्याच खटपटीत ते आहेत आणि आपण या लेखात त्यांच्या ह्या प्रयत्नाचा आढावा घेणार आहोत.

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३

धरणीच्या गर्भातील ऊब: उष्ण झरे / Hot Springs


तुरलचा उष्ण झरा छायाचित्र आभार: डॉ. डी. व्ही. रेड्डी,
वैज्ञानिक, एनजीआरआय
उष्ण ऱ्यांच्या पाण्याबद्दल तसे आपण सगळेच ऐकून असतो. काही ऱ्यांचं पौराणिक कथांमधे वर्णन येतं. तिथे ॠषीमुनींचं वास्तव्य होतं, म्हणून आज ती ठिकाणं तीर्थक्षेत्रं म्हणूनही प्रसिध्द आहेत. या पाण्याचे गुणधर्म नेहमीच्या वापरात येणाऱ्या पाण्यापेक्षा वेगळे असतात ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली माहिती जरी सगळ्यांना असली तरी ऱ्या जणांना हे कशामुळे होतं हे समजलेलं नसतं. तरी अशा ठिकाणी बरीच गर्दी असते. या गर्दीतले काही जण श्रध्देने व्याधींवर उपाय म्हणून, काही केवळ पुण्यसंचय करण्यासाठी तर काही निखळ आनंदासाठीही यात स्नान करतात. भूजलाची आपल्याला ओळख म्हणजे विहिरीतलं पाणी. गेली काही वर्ष शहरी माणसांना नळातून येणाऱ्या पाण्याचीच इतकी सवय झाली आहे की विहिरी जवळ-जवळ विसरल्याच होत्या. पण आता दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची पुन्हा ओळख होत आहे म्हणलं तरी चालेल. तर मग या विहिरींमधील ऱ्यातून येणाऱ्या पाण्यात आणि उष्ण ऱ्याच्या पाण्यात काय फरक आहे? ढोबळ फरक सांगायचा तर विहिरीतील झरे हे जमिनीपासून थोड्याच खोलीवर असतात तर उष्ण ऱ्यांचा स्त्रोत जमिनीत खूप खोल असतो आणि हे नैसर्गिकरित्या जमिनीच्या भेगांमधून वर येतात, अर्थात हे ठिकाण ज्वालामुखीच्या क्षेत्रातलं नसेल तेव्हा. कारण तिथे लाव्हाच द्रवाच्या रुपात बाहेर पडत असतो. उष्ण झरे पृथ्वीवर ऱ्या ठिकाणी आहेत. भूभागाचं तपमान जसजसं खोल जाऊ तसतसं वाढत जातं. त्यामुळे पाणी जितकं जमिनीत खोलवर मुरतं तितकी त्याची उष्णता वाढत जाते आणि हेच पाणी जेव्हा भूपृष्ठावर येतं तेव्हा तिथली उष्णता घेऊन बाहेर पडतं. उष्ण पाणी या ऱ्यातून बाहेर पडण्याचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. हा प्रवाह अगदी झुळुझुळु वहाणाऱ्या पाण्यापासून ते अगदी नदीच्या प्रवाहाएवढा असू शकतो. काही ठिकाणी तर हे पाणी मोठ्या दाबाखाली कारंजासारखं जमिनीतून बाहेर पडत असतं.

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

गोविंदाSS, सावध रे! / Dahi handi pyramid participants, please be cautious


दही हंडी - जय भारत सेवा संघ, चित्र आभार: विकीपिडीया
दही हंडी फोडण्यासाठी पिरॅमिड्स बांधताना गोविंदांनी घ्यायची काळजी: अपघातांच्या अभ्यासातून केलेले निदान 

पुराणकथांमधून समाजाला जगण्याचं सार गोष्टीरुपात शिकवलं जात असे. त्यामुळे ऐकणारा आपल्या कुवतीनुसार त्यातून अर्थ काढून रमत असे. सण, उत्सव यांचा हेतू या साराची उजळणी करण्यासाठी आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दही चोरण्याची कथाही अशीच आपल्याला समाजात कसं जगावं याचं दर्शन घडवते. कृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात जरी झाला असला तरी त्याचं बालपण गोकुळात गोपींच्या सान्निध्यात त्यांच्याशी खेळत, त्यांच्या खोड्या काढत गेलं. त्यांनी शिंक्याला बांधलेलं दही, लोणी चोरून खाणं ही गोष्ट रंगवून सांगितली जाते. इतक्या उंचावर बांधलेलं दही हा एकटा खाणार तरी कसा? तर त्याच्या सवंगड्यांना बरोबर घेऊन. एकमेकाच्या खांद्यावर उभं रहात ते दह्यापर्यंत पोहोचत आणि आनंद लुटत. सवंगडी वेगवेगळ्या जातीतले, परिवारातले. ध्येय साध्य करायचं असेल तर त्यांच्यात भेदभाव करून चालणार नाही ही यातून मिळणारी शिकवण. तसंच लोणी, दही हे स्निग्ध पदार्थ. शिंक्याला बांधलेल्या या पदार्थांचा हंडी फोडल्यावर सगळ्यांच्या अंगावर वर्षाव होई आणि एकमेकात स्नेह कसा निर्माण करायचा हे यातून कळे.

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१३

भारतातील धरणं उष्णता वाढीस कारणीभूत: भ्रमाचा भोपळा फुटला / Global warming from Indian reservoirs: A delusion

तिळारी धरण
भारतीय जलाशय, जलसिंचनाच्या सोयी आणि जलविद्युत निर्मिती केंद्र ही अनुमान आणि समजुतीपेक्षा कितीतरी कमी प्रदूषण आणि हरितगृह वायू निर्माण करणारी आहेत असा निष्कधरणं र्ष भारतीय वैज्ञानिकांनी काढला आहे.

सूर्यावरून आलेली किरणं पृथ्वीवरून परावर्तित होताना वातावरणातील जे वायू ती शोषून आवरक्त प्रारण (infrared radiation) करतात त्यांना हरितगृह वायू म्हणतात. हेच आज सतत चर्चेत असलेल्या वैश्विक उबेस (global warming) कारणीभूत आहेत. बाष्प, कार्बन डायऑक्साईड, मिथेन,

शनिवार, १ जून, २०१३

निवड: सतीच्या वाणाची की सुधारित वाणाची? / Choice: Hunger or GM crops

सुधारित वाणांचा वापर करून भुकेवर मात करायची की उपाशी मरायचं यावर दोन्ही अंगानी केलेला उहापोह

वनस्पतींचं नवं लाभदायक वाण तयार करण्याचं तंत्र माणसानं आत्मसात करून शेकडो वर्ष झाली. दोन जाती/प्रजातींतून त्यांच्यातल्या चांगल्या गुणांसाठी त्यांचं प्रजनन करुन नवं वाण निर्माण करत माणसानं प्रगती साधली. अधिक धान्य देणारं, किडीला समर्थपणे तोंड देणारं सुधारित वाण संशोधनातून निर्माण होत राहिलं. तसं पाहिलं तर अशा प्रजननामुळे आता इतके नवे वाण वापरात आहेत की मूळ वाणाचं बियाणंच कुठे मिळू नये! वनस्पतीतील जनुकंच विशिष्ट गुणधर्म ठरवतात हे यातून मानवाला कळलं होतं.

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

आकलनशक्तीच्या उपांगांचं सहकार्य / Cooperation among sense organs


आम्ही आमच्या दूरचित्रवाणीसंचाला जेव्हा डीटीएचची जोडणी घेतली तेव्हा कार्यक्रम पहाताना सुरुवातीला मला थोडा त्रास झाला. मालिकेतील पात्रांच्या ओठांच्या हालचाली आणि येणारे शब्द जुळत नाहीयेत असे वाटत होतं आणि त्यामुळे मालिकेत काय चाललं आहे याचे आकलन पट्कन होत नव्हतं. नंतर हा त्रास कधी आणि कसा संपला ते मात्र आठवत नाही. पण याची आठवण व्हायचं कारण म्हणजे नुकताच ’साईंटिफिक अमेरिकन’ या मासिकात प्रसिध्द झालेला कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लॉरेन्स रोसेनब्लम्यांचा ज्ञानेंद्रियांच्या कार्यपध्दतीवरील लेख.

सोमवार, ७ जानेवारी, २०१३

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बुरख्याखालील दिखाऊ सुरक्षा व्यवस्था

एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुण्यांना भेटायला जाण्याचा योग नुकताच आला. हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वाराशी माझी गाडी अडवून तिच्याखाली मागून एका चाकावर लावलेला आरसा दांडयाच्या आधाराने फिरवला गेला, डिकी उघडून पुन्हा लावली गेली आणि पुढे जाण्यासाठी गाडीवर थाप पडली. मी मागे वळून भोळसट भाव चेहर्‍यावर आणून विचारले, "काय पाहिलेस रे?", "साब बॉम्ब फिट किया है क्या देखनेकी आर्डर है". मी पुन्हा प्रश्न विचारला, "बॉम्ब कसा असतो रे"? सुरक्षा कर्मचारी ओशाळं हसला आणि मला पुढे जा म्हणाला तोवर माझ्या मागची वाहनं हॉर्न वाजवायला लागली होती. बॉम्बच लावून मला माझं वाहन आत न्यायचं असेल तर तो मी गाडीच्या मागेच लावला पाहिजे असं काही असतं का? अर्थात तेही मला माहीत नाहीये. कारण मी दहशतवादी नाहीये. पण अशा प्रकारच्या तपासण्या आजकाल जागोजाग केल्या जातात. 'भाबड्या' दशहतवाद्यांना वाटावं की आपला इथे काही पाड लागणार नाही असा हेतू असतो की काय न कळे!

स्थळ विमानतळ. इथे तर अनेक सुरक्षा 'सर्कशीतून' जावे लागते. इतर प्रवासात प्रवाशांची एवढी 'सुरक्षा चंगळ' केली जात नाही. विमान प्रवास करणारे सगळेच व्हीआयपी असतात असे अजूनही यंत्रणांना वाटते की काय न कळे. तरी शशी थरूरनी सांगून झालंय की इथेही 'कॅटल क्लास' असतो ते. असो. पहिला मुजरा घडतो तो वाहनातून विमानतळावर शिरण्याअगोदरच. आडव्या तिडव्या लावलेल्या बॅरिकेड्समधून वाहनाचा वेग कमी करत ते पुढे काढावे

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

विषाला सोन्याचे मूल्य / Snake venom

आज्ञावली लिहिणार्‍यांचा देश म्हणून भारत भरभराटीला येण्यापूर्वी म्हणजे सुमारे २५-३० वर्षांपूर्वी बर्‍याच पाश्चिमात्यांना भारताची ओळख एक योगासनं करणार्‍यांचा आणि दाट जंगलांचा, त्यातील नरभक्षक प्राण्यांचा आणि विषारी सापांचा देश अशी होती! आपल्यापैकी किती जणं योगासनं करतात ते मला माहीत नाही पण भारतातली जंगलं आणि वनसंपदा जरी झपाट्यानं कमी होत असली तरी विषारी साप चावून मरणार्‍यांची संख्या मात्र कमी झालेली नाहीये. व्हिटाकरद्वयांचा याबाबतच्या सद्यपरिस्थितीवर एक छान लेख 'करंट सायन्स' (खंड १०३, अंक ६, पृष्ठे ६३५-६४३) या विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. त्याचा हा आढावा.