earth_sciences लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
earth_sciences लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १० मे, २०२१

हवामान बदल आणि महाराष्ट्राची सज्जता /Preparedness for climatic change in Maharashtra

'हवामान बदल' हा वाक्प्रयोग आजकाल वरचेवर ऐकायला मिळतो. जगाची आपल्याला काळजी आहे अशा दृष्टीने तो सगळेच साध्या गप्पांमध्येही वापरतात पण त्या बदलाला आळा घालायला आपण स्वतः जे काही करु शकतो ते करायची मात्र तयारी नसते. हवामानात नैसर्गिकरित्या बदल होत असतातच पण मानवनिर्मित घडामोडी, उद्योग त्याला बळ पुरवतात. किंबहूना सर्वाधिक बदल हा मानवनिर्मित घडामोडींमुळे आहे असे अभ्यासाअंती कळले आहे आणि म्हणूनच त्याला आळा घालता येणे शक्य आहे असे मानले जाते. आर्थिकदृष्ट्या संपन्न समाज, व्यक्तीला तंत्रज्ञानातून सहजी हाताशी येणार्‍या सुखसोयींना आणि समाजरीतीला डावलणे जड जाते पण त्यामुळेच मोठ्या प्रमाणात हवामान बदल होतो. त्याच्या आहारी जाऊ नका असे म्हटले तर पळवाटा शोधल्या जातात, एकमेकांकडे बोटे दाखवणे सुरु होते. सैन्यदलात दुसर्‍याच्या अपत्याने सहभागी व्हावे पण स्वतःच्या नको अशा विचारसरणीसारखेच हे.  पर्यावरण बदलाच्या नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनादरम्यान भारताच्या पंतप्रधानांनी आपली जीवनशैली बदलावी, शाश्वत अशा भारतीय जीवनपद्धतीचा अंगिकार करावा असे सुचवले आहे. अर्थात यात नवे असे काही नाही. पण हे कोण करायला तयार होईल हा खरा प्रश्न आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती, समाज, देश जीवनशैली बदलायचा विचार करणार नाहीत (जोपर्यंत त्यांच्यावर याचे दुष्परिणाम भोगायची वेळ मोठ्या प्रमाणात येत नाही) तोपर्यंत हवामान बदल होत राहील आणि त्याचा अधिकतम प्रतिकूल परिणाम आर्थिकदृष्ट्या गरीब देशाच्या समाजावर होत राहतो हे वास्तव आहे. हवामान बदलाने प्रभावित होणार्‍या देशांच्या यादीत भारत नेहमीच पहिल्या दहात असतो (जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१ नुसार हवामान बदलांमुळे २०१९ साली झालेल्या सर्वाधिक प्रभावित देशांत भारताचा क्रमांक सातवा लागला आहे). हवामान बदलाचे वास्तव दोन प्रकाराने मोजले जाते. एक तर अशा बदलामुळे आलेले नैसर्गिक संकट किती हानी (hazard) पोहोचवून गेले ते आणि अशा बदलांना सक्षमतेने तोंड न देऊ शकणारा, असुरक्षित (vulnerable) समाजाचे प्रमाण किती आहे याचे मोजमाप करणे. हानीचे मोजमाप संकट येऊन गेल्यावर तर सक्षमतेचा अंदाज संकटापूर्वी घेतला जातो. हवामान बदलांमुळे होणार्‍या संभाव्य हानीमुळे कोलमडून न पडता त्याला सक्षमतेने तोंड देऊ शकण्याची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ताकद समाजात असणे ही प्राथमिकता असते. यावर विविध ठिकाणच्या शासनाने समाजाला समर्थ करण्यावर भर देणे त्याचे कर्तव्य ठरते. आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी कार्य करणारी एक संस्था आहे (अंतरशासकीय हवामान बदलाभ्यास मंडळ - आयपीसीसी). या संस्थेने कोणते सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक घटक, पायाभूत संस्था आणि सुविधांच्या सोयी हवामान बदलाला क्षमतेने तोंड देण्यासाठी उपकारक आणि हानीकारक ठरु शकतात याचे मापदंड निर्माण केले आहेत. एखादा देश किंवा त्याचा घटक अशा बदलाला किती प्रमाणात तोंड द्यायला सक्षम आहे हे ठरवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. उदा. दळणवळणाच्या सोयी, ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत वनक्षेत्राचे प्रमाण, एकूण शेतीत बागायतीचा हिस्सा, आरोग्य सेवांची उपलब्धता, कमावत्या महिलांचे प्रमाण, मनरेगा सारख्या योजना, पीकांचा विमा, अशा बाबी संकटसमयी उपकारक ठरतात. म्हणजे असे की आपत्कालीन परिस्थितीत सुलभतेने हालचाल करण्यासाठी दळणवळणाच्या सोयींमुळे मालमत्ता आणि मनुष्यहानी टाळता येते, इमारती लाकडाव्यतिरिक्त इतर उत्पादनांचे साधन ग्रामीण समाजाच्या हाती वनक्षेत्रातून मिळू शकते, शेतीच्या तुलनेत बागायती आपत्कालीन परिस्थितीत थोडा तरी टिकाव धरते आणि त्यातून उत्पन्न चालू राहते, तात्काळ मिळणार्‍या आरोग्य सेवांमुळे समाज पुन्हा शारीरिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, सामाजिक योजनांमुळे आपत्तीमुळे नुकसान झाले तरी उत्पनाचे साधन मिळून माणूस तग धरु शकतो. मापदंडात हानीकारक ठरणार्‍या काही घटकांचा अंतर्भावही आहे. जसे, एकल पीक पद्धत, उत्पन्नासाठी केवळ नैसर्गिक स्त्रोतांचाच आधार, पावसाळी शेतीखालचे क्षेत्र, कीटक संक्रमित आणि दूषित पाण्यामुळे होणार्‍या रोगांची तीव्रता, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी, अल्प भूधारकांची संख्या वगैरे. पीकांमध्ये विविधता नसेल, केवळ नैसर्गिक स्रोतांवर समाज अवलंबून असेल तर आपत्कालीन परिस्थितीत उत्पन्नाचे गणित कोलमडते, दुष्काळी परिस्थितीत पीक जगवण्यासाठी पाण्याचे इतर पर्याय नसले तर सगळ्या कष्टांवरच पाणी फेरले जाते, रोगराईमुळे मनुष्यबळाला मर्यादा येते, तर हाती बचत नसल्यामुळे अशा वेळी समाजाला स्थलांतर करावे लागते.
आकृती क्र. १. भारतातल्या राज्यांच्या दुबळेपणाची वर्गवारी आणि क्रमवारी

याच मापदंडांचा वापर करीत निवडक भारतीय संशोधन संस्थांनी भारतातली राज्ये आणि जिल्हा निहाय दुबळेपणाचा एक अहवाल नुकताच सादर केला आहे. जागतिक स्तरावर आणि या अहवालानुसार संपूर्ण भारत हा अशा बदलांना तोंड द्यायला दुबळाच आहे हे तर अधोरेखित झाले आहे. पण हा अहवाल बातमीत आला तेव्हा मराठी मनाची मान उंचावली. कारण महाराष्ट्र राज्य सगळ्या राज्यांच्या तुलनेत हवामान बदलाला तोंड देण्यात 'सर्वात कमी दुबळा' असल्याची नोंद आहे (आकृती क्र. १.). म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी! भारतातील राज्यांची अतिशय दुबळी, माफकरित्या दुबळी आणि कमी दुबळी अशी विभागणी केलेली पाहायला मिळते. पण महाराष्ट्राच्या बाबतीतले निष्कर्ष संपूर्ण खरे नाहीत. हा मराठी मुलूख वरील मापदंडांमध्ये उजवा ठरण्याचे कारण सांख्यिकीय पद्धतीला असलेल्या मर्यादा. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमुळे या राज्याचे सकल राज्यांतर्गत उत्पादन तगडे होते आणि तो  इतर भागाच्या दुबळेपणावर पांघरुण घालतो हे दुर्दैवी सत्य नजरेसमोर येते. महाराष्ट्रामध्ये शेतकी आणि अशा प्राथमिक क्षेत्राचा सकल राज्यांतर्गत उत्पादनातला हिस्सा नगण्य आहे असाच त्याचा अर्थ. अर्थात काही बाबी उजव्या आहेत त्याचीही नोंद हा अहवाल करतो. उदा. मनरेगासारख्या योजनांची अंमलबजावणी, आरोग्य क्षेत्राची खालच्या स्तरापर्यंत बर्‍यापैकी बांधणी या बाबी ठळकपणे नजरेस आणल्या आहेत. पण अधिकतम प्रदेश, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातले जिल्हे दुष्काळीच आहेत, केवळ १८ टक्के शेती सिंचनक्षेत्राखाली येते आणि विविध सरकारे आली तरी यावर दीर्घकालीन उपाय शोधायला कोणालाही वेळ आणि स्वारस्य नसल्याचेच दिसते. त्यामुळे अतिशय आणि माफक प्रमाणात असुरक्षित असलेल्या जिल्ह्यांची संख्याच अधिक्याने आहे (आकृती क्र.२).
आकृती क्र.२. महाराष्ट्रः हवामान बदलाला सामोरे जायला जिल्ह्यांच्या दुबळेपणाची वर्गवारी

या अहवालातील अल्पप्रमाणात असुरक्षित असलेल्या राज्यांच्या जिल्ह्यांची माहिती एकत्र केली आणि किती टक्के जिल्हे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या वर्गवारीत मोडतात याची छाननी केली. तेव्हा असे दिसून आले की देशस्तरावर महाराष्ट्र जरी सर्वात कमी दुबळा असल्याचा निष्कर्ष काढलेला असला तरी केरळ, गोवा आणि हरयाणा या राज्यांमध्ये अल्पप्रमाणात असुरक्षित असलेल्या जिल्ह्यांचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचा क्रमांक त्यांच्यामध्ये चवथा लागतो (आकृती क्र. ३). म्हणजे 'प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' जरी असला तरी काही बाबींमध्ये अधिक डोळसपणे लक्ष घालून त्यात सुधारणा करणे आवश्यक ठरते म्हणजे तो अधिक प्रिय होईल. लेखात उल्लेखलेले मापदंड केवळ हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी नसून सगळ्याच मराठी मनांच्या रोजच्या जगण्यासाठीही त्याचा सकारात्मक उपयोग होऊ शकतो हे नमूद करावेसे वाटते.
आकृती क्र. ३. भारतातल्या अल्पप्रमाणात असुरक्षित असलेल्या राज्यांतील जिल्ह्यांची दुबळेपणातली वर्गवारी (टक्केवारीत)

संदर्भ : 
  1. Prime Minister addresses Leaders' Summit on Climate. 22 Apr 2021. http://newsonair.com/News?title=Prime-Minister-addresses-Leaders%26%2339%3B-Summit-on-Climate%3B-Says-India-has-taken-many-bold-steps-on-clean-energy%2C-energy-efficiency%2C-afforestation-and-bio-diversity&id=414864
  2. Indian Institute of Technology Mandi and Indian Institute of Technology Guwahati and Indian Institute of Science, Bengaluru. Climate Vulnerability Assessment for Adaptation Planning in India Using a Common Framework. DST, Govt. of India. 2019-2020. 167 pages. https://dst.gov.in/sites/default/files/Full%20Report%20%281%29.pdf
  3. David Eckstein, D. et al. Global Climate Risk Index 2021. January 2021. https://germanwatch.org/sites/default/files/Global%20Climate%20Risk%20Index%202021_2.pdf


हा लेख १० मे २०२१ च्या दैनिक लोकसत्तेत संपादित स्वरुपात प्रसिद्ध झाला. https://epaper.loksatta.com/3088836/loksatta-mumbai/10-05-2021#page/7/1














मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४

वाळवी: निसर्गातले धातूकर्मी अभियंते / Termites: Metallurgical engineers in nature

वाळवी म्हणलं की शहरी माणसाच्या अंगावर काटा उभा रहातो. ती एखाद्या वस्तूला लागली की त्या वस्तूचा भुगा करुनच पुढे जाणार हे सत्य. शक्यतो दमट जागा तिच्या खास आवडत्या. इमारतीच्या पायात, पुस्तकांना, लाकडी सामानाला, कापडी जिन्नस, गाद्या, कशालाही ती लागते आणि थोडक्या वेळात त्या वस्तूचं होत्याचं नव्हतं करुन टाकते. जमिनीत तर ती असतेच. जंगलात, ओसाड जागी मातीची उंचच उंच वारूळं करुन त्यात निवास करणं हा तर त्यांचा हक्कच!

माणसाचा हा शत्रू असला तरी वाळवीला त्याने आपल्या फायद्यासाठी राबवलं आहे. अगदी पुराणकाळापासून. वराहमिहिराने बृहत संहितेत विहिर खणायची असेल तर वाळवीचं वारूळ असलेली जागा शोधून काढा असा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांचा भक्ष्य म्हणूनही वापर केला जातो. भारतातही ओडिशा, झारखंड राज्यातले आदिवासी वाळवीच्या मुंग्या (आपण त्यांना मुंग्या म्हणत असलो तरी त्यांचं आणि मुंगीचं कुळ वेगळं असतं) मोठ्या संख्येने एका ठिकाणी असतात तेव्हा त्यांना पकडून, भाजून नुसतंच किंवा भाताबरोबर खातात. वाळवी शक्तीदात्री आहे. अगदी मासळीतून मिळणार्‍या उश्मांकापेक्षा. प्रत्येक १०० ग्रॅम वाळवीत ६१३ उष्मांक मिळतात तर मासळीमध्ये १७० (Indian Journal of Traditional Knowledge 8(4); 2009; 485-494). यावरुन तिच्या उपयुक्ततेची कल्पना यावी.

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

कच्छच्या रणात नौकानयन / Navigation in the Rann of Kachchh

कच्छ हा गुजरातमधील भारताच्या पश्चिम टोकाला असलेला एक जिल्हा. भारतातील जिल्ह्यांमध्ये आकाराने सर्वात मोठा - ४६ हजार चौरस कि.मी. व्यापणारा पण सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. भारताची पूर्वोत्तर राज्ये, जम्मू-काश्मीर आणि जैसलमेरनंतर कमी लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांमध्ये याचाच क्रमांक लागतो - दर चौ.कि.मी. मागे केवळ ४६ लोकसंख्या असलेला. गुजरातेतील सुरतमध्ये ही लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. मागे १४४० तर मुंबईत ४८ हजार आहे यावरुन कच्छमध्ये किती किरकोळ आहे याची कल्पना यावी. 'कच्छचं रण' या नावानं ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्यातला भाग म्हणजे एक मोठं कोडंच आहे म्हणाना!  'कच्छ' ह्या शब्दाचा अर्थ आलटून-पालटून दलदलीचा आणि कोरडा होणारा भूभाग असं विकिपिडीयात म्हणलंय (http://en.wikipedia.org/wiki/Kutch_District). तर 'रण' या शब्दाचा उगम संस्कृत शब्द 'ईरिण' यातून झाला असावा ज्याचा अर्थ ओसाड प्रदेश, नापीक जमीन असा होतो. ३०० कि.मी. पूर्व-पश्चिम आणि काही ठिकाणी १५० कि.मी. दक्षिणोत्तर पसरलेला हा भूभाग समुद्रसपाटीपासून म्हणण्यापुरत्याच उंचीवर आहे. यातल्या मधल्या उंच भूभागामुळे याचे दोन भाग झाले आहेतः उत्तरेचं 'थोरलं रण' (Great Rann) - सुमारे १८००० चौ.कि.मी. आणि आग्नेय (दपू) दिशेला 'धाकटं रण' (Little Rann) - सुमारे ५००० चौ.कि.मी.  कच्छ जिल्ह्याचा बराचसा भाग हे रण व्यापतात. थोरलं रण अरबी समुद्राला कोरी खाडीनं जोडलं आहे तर धाकटं रण कच्छच्या आखाताला. पावसाळ्यात रणाचा बराचसा भाग पाण्याखाली रहातो तर इतर ऋतुत (नोव्हेंबर ते मे) मात्र ते बहुधा कोरडेच असते.

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

राजकन्येने भूप्रदेश गिळला तेव्हा... / Erosion due to River Princess shipwreck

निसर्गाचं आकर्षण कोणाला नसतं? उंच पर्वतराजी असोत की गर्द हिरवी जंगलं किंवा समुद्रकिनारे. तासनतास इथं शांतपणे बसा. आजिबात कंटाळा येत नाही. निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देत असतो. मग त्याच्या सान्निध्यात कंटाळ्याचा प्रश्नच येतो कुठे? पण बर्‍याच जणांना निसर्गाचं सौंदर्य कसं आस्वादायचं हेच कळत नाही आणि त्याची परिणती ते ओरबाडण्यात होते आणि ते विद्रूप व्हायला सुरुवात होते. गोव्याचे अथांग, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे असेच सगळ्यांना भुरळ घालतात. विदेशी नागरिक तर महिनोनमहिने येथे मुक्काम ठोकून असतात. भारतातल्या इतर भागातले नागरिकही संधी मिळताच गोव्यात पुनःपुन्हा यायला एका पायावर तयार असतात. त्यांच्या स्वछंद आणि 'स्वतंत्र' वागण्याचे विपरीत परिणाम निसर्गावर होत असतातच. पर्यटनाव्यतिरिक्त इतर उद्योगही निसर्गावर मोठे परिणाम घडवत असतातच. ६ जून २००० या दिवशी असाच एक घाला गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर पडला. 'एमव्ही रिव्हर प्रिंसेस' नावाचं प्रचंड मोठं, २५८ मीटर लांब आणि ३५ मीटर रुंदीचं, एक तेलवाहू जहाज वादळामुळे भरकटलं आणि कांदोळीच्या किनार्‍याजवळ ५ मीटर खोल पाण्यात येऊन रुतलं. जहाजाचा पुढचा भाग नैऋत्येला (दप) तोंड करून पुळणीपासून जवळच म्हणजे ३९० मीटर तर मागचा भाग १८७ मीटर अंतरावर होता. तेथून ते हलवण्यात अनेक मानवनिर्मित अडचणी येत गेल्या आणि एप्रिल २०१२ च्या अखेरीपर्यंत हे जहाज तेथेच मुक्काम ठोकून निसर्ग विद्रूप करण्यात आपला हातभार लावत उभं होतं. या दरम्यान तिथं घडलेल्या प्राकृतिक बदलांचा अभ्यास राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी करून नुकताच प्रसिध्द केला आहे (करंट सायन्स खंड १०५, वर्ष २०१३, पृष्ठ ९९०). अशी संकटं निसर्गावर कसा घाला घालतात याची माहिती वाचकांना आणि धोरणकर्त्यांना उद्बोधक ठरावी.

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३

धरणीच्या गर्भातील ऊब: उष्ण झरे / Hot Springs


तुरलचा उष्ण झरा छायाचित्र आभार: डॉ. डी. व्ही. रेड्डी,
वैज्ञानिक, एनजीआरआय
उष्ण ऱ्यांच्या पाण्याबद्दल तसे आपण सगळेच ऐकून असतो. काही ऱ्यांचं पौराणिक कथांमधे वर्णन येतं. तिथे ॠषीमुनींचं वास्तव्य होतं, म्हणून आज ती ठिकाणं तीर्थक्षेत्रं म्हणूनही प्रसिध्द आहेत. या पाण्याचे गुणधर्म नेहमीच्या वापरात येणाऱ्या पाण्यापेक्षा वेगळे असतात ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली माहिती जरी सगळ्यांना असली तरी ऱ्या जणांना हे कशामुळे होतं हे समजलेलं नसतं. तरी अशा ठिकाणी बरीच गर्दी असते. या गर्दीतले काही जण श्रध्देने व्याधींवर उपाय म्हणून, काही केवळ पुण्यसंचय करण्यासाठी तर काही निखळ आनंदासाठीही यात स्नान करतात. भूजलाची आपल्याला ओळख म्हणजे विहिरीतलं पाणी. गेली काही वर्ष शहरी माणसांना नळातून येणाऱ्या पाण्याचीच इतकी सवय झाली आहे की विहिरी जवळ-जवळ विसरल्याच होत्या. पण आता दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची पुन्हा ओळख होत आहे म्हणलं तरी चालेल. तर मग या विहिरींमधील ऱ्यातून येणाऱ्या पाण्यात आणि उष्ण ऱ्याच्या पाण्यात काय फरक आहे? ढोबळ फरक सांगायचा तर विहिरीतील झरे हे जमिनीपासून थोड्याच खोलीवर असतात तर उष्ण ऱ्यांचा स्त्रोत जमिनीत खूप खोल असतो आणि हे नैसर्गिकरित्या जमिनीच्या भेगांमधून वर येतात, अर्थात हे ठिकाण ज्वालामुखीच्या क्षेत्रातलं नसेल तेव्हा. कारण तिथे लाव्हाच द्रवाच्या रुपात बाहेर पडत असतो. उष्ण झरे पृथ्वीवर ऱ्या ठिकाणी आहेत. भूभागाचं तपमान जसजसं खोल जाऊ तसतसं वाढत जातं. त्यामुळे पाणी जितकं जमिनीत खोलवर मुरतं तितकी त्याची उष्णता वाढत जाते आणि हेच पाणी जेव्हा भूपृष्ठावर येतं तेव्हा तिथली उष्णता घेऊन बाहेर पडतं. उष्ण पाणी या ऱ्यातून बाहेर पडण्याचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. हा प्रवाह अगदी झुळुझुळु वहाणाऱ्या पाण्यापासून ते अगदी नदीच्या प्रवाहाएवढा असू शकतो. काही ठिकाणी तर हे पाणी मोठ्या दाबाखाली कारंजासारखं जमिनीतून बाहेर पडत असतं.

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१३

भारतातील धरणं उष्णता वाढीस कारणीभूत: भ्रमाचा भोपळा फुटला / Global warming from Indian reservoirs: A delusion

तिळारी धरण
भारतीय जलाशय, जलसिंचनाच्या सोयी आणि जलविद्युत निर्मिती केंद्र ही अनुमान आणि समजुतीपेक्षा कितीतरी कमी प्रदूषण आणि हरितगृह वायू निर्माण करणारी आहेत असा निष्कधरणं र्ष भारतीय वैज्ञानिकांनी काढला आहे.

सूर्यावरून आलेली किरणं पृथ्वीवरून परावर्तित होताना वातावरणातील जे वायू ती शोषून आवरक्त प्रारण (infrared radiation) करतात त्यांना हरितगृह वायू म्हणतात. हेच आज सतत चर्चेत असलेल्या वैश्विक उबेस (global warming) कारणीभूत आहेत. बाष्प, कार्बन डायऑक्साईड, मिथेन,