वारूळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वारूळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४

वाळवी: निसर्गातले धातूकर्मी अभियंते / Termites: Metallurgical engineers in nature

वाळवी म्हणलं की शहरी माणसाच्या अंगावर काटा उभा रहातो. ती एखाद्या वस्तूला लागली की त्या वस्तूचा भुगा करुनच पुढे जाणार हे सत्य. शक्यतो दमट जागा तिच्या खास आवडत्या. इमारतीच्या पायात, पुस्तकांना, लाकडी सामानाला, कापडी जिन्नस, गाद्या, कशालाही ती लागते आणि थोडक्या वेळात त्या वस्तूचं होत्याचं नव्हतं करुन टाकते. जमिनीत तर ती असतेच. जंगलात, ओसाड जागी मातीची उंचच उंच वारूळं करुन त्यात निवास करणं हा तर त्यांचा हक्कच!

माणसाचा हा शत्रू असला तरी वाळवीला त्याने आपल्या फायद्यासाठी राबवलं आहे. अगदी पुराणकाळापासून. वराहमिहिराने बृहत संहितेत विहिर खणायची असेल तर वाळवीचं वारूळ असलेली जागा शोधून काढा असा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांचा भक्ष्य म्हणूनही वापर केला जातो. भारतातही ओडिशा, झारखंड राज्यातले आदिवासी वाळवीच्या मुंग्या (आपण त्यांना मुंग्या म्हणत असलो तरी त्यांचं आणि मुंगीचं कुळ वेगळं असतं) मोठ्या संख्येने एका ठिकाणी असतात तेव्हा त्यांना पकडून, भाजून नुसतंच किंवा भाताबरोबर खातात. वाळवी शक्तीदात्री आहे. अगदी मासळीतून मिळणार्‍या उश्मांकापेक्षा. प्रत्येक १०० ग्रॅम वाळवीत ६१३ उष्मांक मिळतात तर मासळीमध्ये १७० (Indian Journal of Traditional Knowledge 8(4); 2009; 485-494). यावरुन तिच्या उपयुक्ततेची कल्पना यावी.